दहशतवाद्यांना चिथावणी दिल्यास पाकिस्तानवर पुन्हा हल्ला   

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा इशारा 

ब्रेसेल्स : ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षबंदीबाबत विरोधी पक्ष सरकारला सतत प्रश्न विचारत आहेत. भारताने पाकिस्तानसोबत संघर्षबंदी का जाहीर केली. संघर्ष एका कारणामुळे थांबला ते म्हणजे आम्ही १० तारखेच्या सकाळी पाकिस्तानच्या मुख्य आठ हवाई तळांवर हल्ले केले आणि त्यांना निष्क्रिय केले. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना चिथावणी दिली गेल्यास पुन्हा हल्ले करु, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे.
 
अमेरिकन न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जयशंकर म्हणाले, दहशतवादी कुठे आहेत याची आम्हाला पर्वा नाही. जर ते पाकिस्तानात  अगदी आत लपले असतील तर त्यांना आम्ही तेथे जाऊ शोधून काढून ठार करु, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. पाकिस्तान असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर राज्य धोरणाचे साधन म्हणून करण्यात खूप मग्न आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांना युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारी परिस्थिती अजूनही अस्तित्वात आहे का? असे विचारले असता, ते म्हणाले, जर तुम्ही दहशतवादाशी असलेल्या वचनबद्धतेला तणावाचे कारण म्हटले तर ते निश्चितच आहे.
 
या हल्ल्यात भारतीय विमानांचे नुकसान झाल्याच्या वृत्तांबद्दल जयशंकर म्हणाले, माझ्या मते, राफेल किती प्रभावी होते किंवा इतर यंत्रणा किती प्रभावी होत्या, याचा पुरावा पाकिस्तानची निष्क्रिय झालेले हवाई क्षेत्र आहे, असे त्यांनी नमूद केले.
 

Related Articles